Breaking Ticker

दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न



लोणार (प्रतिनिधी)

 श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधीश परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व आदरणीय युवासंत चंद्रकांत दादासाहेब यांच्या परवानगीने श्री दत्त जयंती अखंड जप नाम यज्ञ सप्ताह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समर्थ नगर लोणार येथे दि.20/12/2023ते 27/12/2023 पर्यंत आयोजित करण्यात आला होता .या सप्ताह मध्ये सामुदायिक गुरूचरित्र पारायण,प्रहर सेवा, गणेश याग, चंडी यांग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती पठण, दुर्गा सप्तशती पठण, यांसारख्या विविध ग्रंथ पठण सेवा अखंड पन्हे सुरू होत्या. प्रहर सेवेमध्ये दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत पठण, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, दोन सेवेकरी विना वादन करून श्री स्वामी समर्थ मंत्र जप सेवा अखंड पणे करत होते .आज या सप्ताहाची समाप्ती  झाली आहे. लोणार शहरातील  सामुदायिक श्री गुरुचरीत्र पारायणास सुरूवात झाली तेव्हा  पासून 141 पारायण करणारे  सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.प्रहर सेवा देखील सुरू होत्या .या मध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महिला सेवेकऱ्यांनी  सेवा दिली तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष  सेवेकऱ्यांनी सेवा दिली.  या नंतर ही जास्तीत जास्त लोकांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन अतिउच्च कोटींची सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या चरणी रुजू केली .

 आपली कोणतीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गात असून आपल्या समस्येवरील अध्यात्मिक मार्गदर्शन साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समर्थ नगर लोणार  येथे डॉ सुशील अग्रवाल यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्या मार्फत करण्यात आले आहे. खूप  कालावधी पासून लोणार परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू  असून  हजारो सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला जोडले गेले आहेत. समस्या अनुरूप मार्गदर्शन घेऊन समस्या सूटल्याचे अनुभव हजारो सेवेकरी घेत आहेत.  आज या सप्ताह चा शेवटचा दिवस होता आज सकाळी पासून केंद्र मध्ये गर्दी पहावयास मिळाली 10 ,30 च्या मंगल आरती नंतर महाप्रसाद चे वाटप करण्यात आले त्या मध्ये हजारो भक्तांनी लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार येथे दर गुरुवारी व रविवारी संध्याकाळ च्या आरती नंतर प्रश्न उत्तरी घेण्यात येते ,याचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त भक्तांनी घ्यावा असे अवाहन लोणार केंद्र कडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.