Breaking Ticker

बलात्कारी नराधामांचा अंत होईल का ? खरचं आपल्या देशांत आया - बहिणी - लेकी सुरक्षित आताआहेत का ?

 


प्रतिनिधी - उमेश जोशी पुणे जिल्हा

दि १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन , कामकार दिन दिवशी ,  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर गावात  धायरीतील पुजापाठ करणारे शुभम कुलकर्णी गुरूजी यांची मुलगी वेदवती आजी कडे सुट्टीसाठी फिरण्यासाठी आलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षाच्या भीमराव कांबळे या नराधामाने गाईच्या गोठ्यात गाई वासरू दाखवतो अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाचे ठेचून निर्घृण हत्या केली . चिमुकली मुलगी दिसत नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध घेतली , सीसी टिव्ही व्दारे शोध घेतला असता आरोपी कळला , पोलिसांनी पण तक्रार लवकर घेतली नाही , घेतांना ही हद्द इथं येत नाही अशा पण घटना घडलेत , या आधी या नराधामावर अशा पध्दतीने गुन्हे दाखल आहेत व तुरूंगातून बाहेर येऊन मोकळा सांड सारखा फिरत होता पोलिस प्रशासन , प्रशासन कायदा यांचा काहीच धाक नाही म्हणून यानी हे कृत्य केलं घटनेनंतर गावात व पुणे शहरात विविध ठिकाणी कडकडीत बंद पुकारण्यात आला .. 

 दि.२/ मे /२०२६ रोजी सायंकाळी वडगांव बुद्रूक धायरी पुणे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नवले ब्रीज पुणे-बेंगलोर महामार्ग  , सनसीटी , सिंहगड रोड , पुर्ण रस्ते बंद करून येथे तीव्र संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन करून नराधमाला मृत्युदंड देण्याची मागणी केली... *नागरिकांचे एकच वाक्य होते  "आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते पाहू,” असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला  दिला आहे.* 

प्रकरणामुळे गावातील वातावरण पुर्ण शहर तापलं असून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे आणि पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना या दरम्यानं लाठीचार्ज केला पण तरी आंदोलन नाही थांबलं ही आपली न्याय व्यवस्था.. 

या आधी अनेक शहरांत गावागावांत लहान पासून ते मोठ्यांपर्यंत अशा प्रवृत्तीच्या नराधामांनी बलात्कार केलेत गुन्हे दाखल होतात पण न्याय मिळत नाही , आरोपी परत सुटतो आणि परता असे गुन्हे करायला मोकळा सुटतो .. यांच्या पाठीमागे कोणाचा वरदहस्त असतो का ? ही शक्यता वाटते , प्रशासन कायदा इतका कडक करावी कि असे बलात्कार अरणारे आरोपी नराधाम हिम्मत काय विचार सुध्दा करणारं नाही हे होणे गरजेचं आहे.. आणि अत्ता पर्यंत जेवढ्या नराधामांनी एक असो वा दोन बलात्कार केले असो यां सर्वांना भरचौकात सर्वांसमोर छत्रपती शासन पद्धतीनेच न्याय करण्यात यावा ही मागणी केली आहे.. अशा नराधामाला तडफडून तफडून मारून वध करावा किंवा फाशी देण्यात यावी तसेच  सरकार कोणतेही असू द्या , प्रशासन कायदा न्याय सुव्यवस्था यांना  विनंती आहे नराधामी कोणीही कुठला का असे ना पण यांना त्यांच्या पध्दतीने वध केलाचं पाहिजेजर असे नाही केले तर पुढे हे असे प्रवृत्तीचे नराधाम वाढतचं राहणार बलात्कार होतचं राहणारं आणि आपला देश बलात्कारी देश म्हणून ओळखला जाईल हा इतिहास होण्याआधी सर्व थांबवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा आणि छत्रपती शासन हाच एकचं आता कायदा जागवा हीच सर्वत्र नागरिकांची घोषणा..



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.